अनुवादाची अनुमती मी मागेच दिलेली आहे . तुम्ही स्वतःला सामान्य वाचक म्हणवून घेत असाल तर माझी गणना अति सामान्यातच करावी लागेल . जी पुस्तकांबाबत ऑफर दिली आहे त्याबद्दल धन्यवाद !
अंतर्दृष्टी (इन्साईट )म्हणजे शहाणपण न्हवे पुस्तक इन्साईटच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत ही त्यांची मर्यादा त्यामुळेच पुस्तक वाचून कुणी मोक्षाला उपलब्ध होत नाही आणि शहाणपण मोक्षाची उपनिर्मिती आहे
मावशीला म्हणजे ताईला अध्यात्मात काडीचाही रस न्हवता त्यामुळं घरातल्या अध्यात्मिक ग्रंथांचे महत्वच तिला कळले नाही फक्त काळी जादू वैग्रे भानगडीबाबतचे ग्रंथ तिने जपून ठेवले माझ्या वडिलांच्याबाबतची तिची खुन्नस हा एक वेगळाच मुद्दा आहे तिने स्वतः मला वडिलांची पेंटिंग्ज दाखवली होती आता ती कुठं आहेत माझ्या घरात लावलेलं नागेशीचं पेंटिंग हे एकमेव पेंटिंग आता शिल्लक आहे आणि तेही प्रार्थनाने शोधून आणून दिले म्हणून !. रोहिदासमामा म्हणजे तुझ्या वडिलांनी मला लहानपणी दिलेली तीन पुस्तके मला आठवतात राजपुत्र ठकसेन , नवनाथ आणि टारझन ! असो आता महत्वाचे आहे ते मामाच्या आठवणींचे काम ! मामाने सरपंच ते आमदारकी आणि नंतरची मगोची पडझड हे सर्व जवळून पाहीले आहे आणि ते सगळं नीट पुढच्या पिढ्यापर्यंत पोहचलं पाहिजे . मी पुन्हा पुन्हा सांगतोय हे रेकॉर्ड करून ठेव . मावशीला म्हणजे ताईला अध्यात्मात काडीचाही रस न्हवता त्यामुळं घरातल्या अध्यात्मिक ग्रंथांचे महत्वच तिला कळले नाही फक्त काळी जादू वैग्रे भानगडीबाबतचे ग्रंथ तिने जपून ठेवले माझ्या वडिलांच्याबाबतची तिची खुन्नस हा एक वेगळाच मुद्दा आहे तिने स्वतः मला वडिलांची पेंटिंग्ज दाखवली होती आता ती कुठं आहेत माझ्या घरात लावलेलं नागेशीचं पेंटिंग हे एकमेव पेंटिंग आता शिल्लक आहे आणि तेही प्रार्थनाने शोधून आणून दिले म्हणून !. रोहिदासमामा म्हणजे तुझ्या वडिलांनी मला लहानपणी दिलेली तीन पुस्तके मला आठवतात राजपुत्र ठकसेन , नवनाथ आणि टारझन ! असो आता महत्वाचे आहे ते मामाच्या आठवणींचे काम ! मामाने सरपंच ते आमदारकी आणि नंतरची मगोची पडझड हे सर्व जवळून पाहीले आहे आणि ते सगळं नीट पुढच्या पिढ्यापर्यंत पोहचलं पाहिजे . मी पुन्हा पुन्हा सांगतोय हे रेकॉर्ड करून ठेव . दोन्ही आजोबा , माझे आईवडील ,दत्ता दादा ह्यांच्यामुळे आपल्या दोन्ही घराण्यांचा (तिळवे नाईक )इतिहास माझ्याकडे आहे पण जे मामाने पाहिले आहे ते कुणीच पाहिलेले नाही . प्रत्यक्ष राजकारण खेळलेला मनुष्य फार वेगळ्या नजरेने घटना बघत असतो . आपल्या मागल्या भेटीत मामाने इंदिरा गांधींचा सांगितलेला किस्सा भन्नाट होता असे अनेक किस्से त्याच्याकडे आहेत आणि ते आपणाला काढूनच घ्यावे लागणार तेव्हा बंधुराज जरा मनावर घ्या माझे आईवडील ,दत्ता दादा ह्यांच्यामुळे आपल्या दोन्ही घराण्यांचा (तिळवे नाईक )इतिहास माझ्याकडे आहे पण जे मामाने पाहिले आहे ते कुणीच पाहिलेले नाही . प्रत्यक्ष राजकारण खेळलेला मनुष्य फार वेगळ्या नजरेने घटना बघत असतो . आपल्या मागल्या भेटीत मामाने इंदिरा गांधींचा सांगितलेला किस्सा भन्नाट होता असे अनेक किस्से त्याच्याकडे आहेत आणि ते आपणाला काढूनच घ्यावे लागणार तेव्हा बंधुराज जरा मनावर घ्या
------------------------------------
हे वैयक्तिक स्पष्टीकरण नाही कविता ह्या वाङ्मयप्रकारावर चर्चा व्हावी म्हणून हे लिहितोय माझ्या प्रेयसीवर आईवर बहिणीवर कविता लिहितांना तिचे सगळे विचार पटायलाच हवे असं नाही भगवान शिव विवेकानंद तुकाराम आंबेडकर मार्क्स महंम्मद गांधी अशा अनेकांच्यावर मी कविता लिहिल्या त्या काही त्यांचे सगळे विचार पटतात म्हणून न्हवे . पतंजलीच्या योगाची सर्वात शास्त्रशुद्ध मांडणी विवेकानंदानी केली आणि कविता योगसाधना राजयोग स्वामी विवेकानंद अशा पार्श्वभूमीवर आहे आणि मी एफ वायला होतो तेव्हा लिहिली होती विवेकानंदांनी त्यावेळी डोक्याला चांगलाच शॉट दिला होता ज्यांना विवेकानंदांची कास्ट दिसते त्यांना सलाम विवेकानंदांचे विचार त्यांच्या काळाचे आहे आणि त्यावर वाद व्हावा पण कविता काही विवेकानंदांच्या विचारांवर नाही
मी त्यावेळी स्वामी प्रभावित होतो बसवेश्वर प्रभावित होतो बुद्ध प्रभावित होतो गांधी प्रभावित होतो आंबेडकर प्रभावित होतो मार्क्सप्रभावित होतो कारण एकोणीस वर्षाच्या पोराची अक्कल एवढीच असते माझा इलाका हा कोल्हापुरातील सर्वाधिक मारामाऱ्या करणारा इलाका आहे मी विवेकानंद वाचले नसते तर मीही हातात तलवारी घेऊनच हिंडलो असतो
तेव्हा स्वामी प्रभाव तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक वाटू शकतो पण माझे जीवन बदलवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे
-------------
मला काही भरारी वैग्रे वाटत नाही मला त्याकाळातही माझ्या मर्यादाच दिसत होत्या हायर मॅथेमॅटिक्स व स्टॅटिस्टिक्स मधलं आपल्याला घंटा काही कळत नाही ह्याची खंत होती आजसुद्धा ९९. ९९९९९९९ % गोष्टींमधलं काही कळत नाही त्यामुळं भरारी कसली घंटा ?सि व्ही रामन चंद्रशेखर ह्यांच्यासारखे काही काम केले असते तर भरारी ! करून करून केलं काय तर कविता !
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आदरणीय अरुंधतीजी
मागील प्रतिक्रिया घाईत दिली होती कारण मी लंघनावर होतो तीन दिवस अन्नपाणी वर्ज्य करून ! असो ! सुरवात झाली हे महत्वाचे ! मी पुन्हा एकदा सांगतो भाषांतराबाबत काही बोलण्याचा मला अधिकार आहे असं मला वाटत नाही ती वेगळीच कला आहे योगात आत्मा एका शरीरातून काढून दुसऱ्या शरीरात ठेवतात तसे !त्यामुळे ह्याबाबत माझ्या पेक्षा नेहा भांडारकर किंवा नितीन वाघ ह्यांचाच सेकण्ड ओपिनियन महत्वाचा मला असे वाटते कि एकतर १०० टक्के विश्वास ठेवावा किंवा अजिबात नाही माझा तुमच्यावर १०० टक्के विश्वास ट्रस्ट आहे तुम्ही केलेले भाषांतर चेक करणे हा प्रकारही अविश्वास दाखवण्यासारखा होईल . मी लिहिलेल्या कवितांच्यात अडकून पडत नाही . हे चांगले कि वाईट मला माहित नाही
पुन्हा एकदा धन्यवाद
श्रीधर तिळवे नाईक