Friday, July 24, 2020


समविचारी सहविचारी विषमविचारी आणि विरुद्धविचारी श्रीधर तिळवे नाईक

आपल्या विचाराची मांडणी करताना आपल्यासारखा विचार करणारा भूतकाळात कोण होऊन गेला वर्तमानात कोण आहे असा विचार अंतःकरणात येणें हे सहज





हा मराठीतला एक मास्टरपीस आहे कल्पनाशक्ती किती कल्पक असावी त्याचा अजोड नमुना


अमला शंकर गेल्या भारतीय नृत्याचे अर्वाचिनीकरण घडवण्यात सिंहाचा वाटा असलेल्या उदय शंकर ह्यांच्या त्या भार्या  भारतीय नृत्याला अर्वाचीन बनवण्यात त्यांचाही  मोलाचा वाटा होता कल्पना चित्रपट त्याचा पुरावा एकंदरच नृत्याकडे नृत्य म्हणून आपण स्वतंत्रपणे बही घायला अद्यापही शिकलेलो नाही त्या शिकवणाऱ्या ज्या काही महत्वाच्या व्यक्ती होत्या त्यापैकी त्या एक माझी त्यांना आदरांजली
श्रीधर तिळवे नाईक



स्वाभाविक आहे आपल्यासारखंच विचार करणाऱ्या माणसाला आपण समविचारी म्हणतो आपल्यासारखा नाही आपल्या विचारांच्या सदृश्य विचार करणाऱ्या माणसाला अपन विषमविचारी म्हणतो काही विचारवंत मात्र आपल्या विचाराच्या पूर्ण विरोधी असा 

Saturday, July 11, 2020



मी विरोधी कॉमेंट्सचाही आदरच करतो अनेकदा त्या पुरेशी माहिती नसल्याने आणि पुरेशी माहिती घेण्याची इच्छा नसल्याने निर्माण होतात बरे त्यात कॉमेंटकर्त्याचा दोष नसतो कारण समोर जे आहे त्यावर भाष्य करणं ही त्याची निकड असते करोनाला कसं सामोरं जायचं ह्याचं उत्तर गंभीर चेहऱ्यानं आणि सुतक पाळत असा त्यांचा समज असतो कि काय न कळे  कोणी डान्स करत सामोरा गेला तर त्यांना प्रॉब्लेम असतो बिचाऱ्यांना असो बाय द वे मी करोनावर खंडकाव्य लिहिलंय त्याचा हा एक तुकडा आहे

म्हणजे काय ते ह्याच कवितेच्या आधारे स्पष्ट करा म्हणजे मला मार्गदर्शन मिळेल

लिहितांना असा विचार न्हवता पण खंडकाव्य होत गेले आणि मी कवी आणि कविता ह्यांच्या दरम्यान कधी येत नाही

धन्यवाद दोन्ही कविता इथे आणल्याबद्दल 

Wednesday, July 8, 2020

दिल बहलांनेको गालिब ये खयाल अच्छा हैं

मराठीत जागतिक मूल्ये नाहीत नवं जग नाही म्हणून आधुनिकतावादी मराठी साहित्याला कमअस्सल म्हणायचे तर मराठी साहित्यात देशी मूल्ये नाहीत देशीवादी मराठीला कमअस्सल म्हणायचे म्हणजे मराठी साहित्य कमअस्सल आहे ह्यावर सगळ्यांचेच एकमत ! वस्तुस्थिती काय आहे ?
श्रीधर तिळवे नाईक


रोमँटिक आधुनिक देशी जालीय नवतेनंतर तुमची पिढी स्वतंत्र मानली तर तिची कोणती मूल्ये आमच्या आणि आमच्या आधीच्या पिढींपेक्षा वेगळी आहेत ?

जे जागतिक आहेत असं तुम्हांला वाटतं ते का जागतिक आहेत ? त्यांच्या साहित्यातील मूल्यांच्यामुळं कि मूल्यांचा जागतिक दर्जाशी काहीच संबंध नाही ?

जागतिक मूल्यं कोणती?
ती जागतिक आहेत हे कसं निश्चित झालं?
लोकशाही, व्यक्तीस्वातंत्र्य, सेक्युलॆरीझम, समता ही सामान्यत: जागतिक मूल्यं मानली जातात.
ही मूल्यं युरोपातील सांस्क्रुतिक आणि आर्थिक-ओद्योगिक घडामोडीतून स्थिर झाली. या मूल्यांचा स्वीकार केल्याने समाजाच्या संपत्तीत कित्येक पटींनी वाढ झाली.
या मूल्यांच्या स्वीकाराने युरोप गरीब झाला असता तर ही मूल्यं जागतिक बनली नसती.
देशी मूल्यं कोणती?
विषमता, निसर्गशरणता, माणूस आणि निसर्ग यांच्यातील सेंद्रीय संबंध, मानवता, करुणा, विविधता.
विषमता वगळता अन्य देशी मूल्यांची सांगड आधुनिक मूल्यांसोबत कशी घालायची हा प्रश्न भारतीय साहित्यात वारंवार चर्चिला जातो. प्रेमचंद, फणीश्वरनाथ रेणु, राही मासूम रझा, यू. आर. अनंतमूर्ती, शिवराम कारंत, तकाजी शिवशंकर पिलई, बशीर, म. फुले, श्री. म. माटे, व्यंकटेश माडगूळकर, गौरी देशपांडे, दया पवार, लक्ष्मण माने, नेमाडे, पठारे, श्याम मनोहर, यादी खूप मोठी आहे.
इंग्रजी साहित्य, फ्रेंच साहित्य, अमेरीकन साहित्य, जर्मन साहित्य,स्पॆनिश साहित्य, चिनी, जपानी, इराणी साहित्य, दक्षिण अमेरीकेतील स्पॆनिश साहित्य, तुर्की साहित्य असं अनेक भाषांमध्ये साहित्य प्रसिद्ध होतं.
या साहित्यात जागतिक मूल्यं आहेत की देशी?
समकालीन राजकारणात -रशिया, अमेरिका, युरोप, चीन, आधुनिक मूल्यांची पीछेहाट झालेली दिसते



जागतिक मूल्य कोणती ह्या प्रश्नाचं उत्तर 
"लोकशाही, व्यक्तीस्वातंत्र्य, सेक्युलॆरीझम, समता ही सामान्यत: जागतिक मूल्यं मानली जातात." असं तुम्हीच दिलंय 
ही सर्व मूल्ये प्रबोधनात्मक आहेत आधुनिकतेनं व उत्तराधुनिकतेनं ह्या मूल्यांच्यापुढे प्रश्नचिन्हे उभी केली हिटलरमुळे सेक्युलरिझमपुढं प्रश्नचिन्हे लागली कारण ज्यू धर्मियांना अतोनात छळले गेले लेनिन व माओने लोकशाहीपुढे प्रश्नचिन्हे उभी केली माणसे समान असतात ह्या मूल्यापुढे जनेटिक्सने प्रश्नचिन्हे उभी केली  तुम्ही म्हणता विषमता, निसर्गशरणता, माणूस आणि निसर्ग यांच्यातील सेंद्रीय संबंध, मानवता, करुणा, विविधता.ही देशी मूल्ये आहेत माझ्या मते ही धार्मिक मूल्ये आहेत आणि ती सर्वच देशात होती आणि त्यांच्यातील विरोधाभासही ! त्यात मी परंपरा ऍड करेन देशीवादाने ह्या धार्मिक मूल्यांना परंपरेच्या आधारे पुन्हा प्रस्तुत केलं आणि त्यांची सांगड प्रबोधनात्मक मूल्यांशी घालण्याचा प्रयत्न केला विशेषतः साहित्यात हे खूप झाले 


हे उत्तर मी सुनील तांबे ह्यांना दिलंय 


मध्यंतरात , globalization नंतर ' ग्लोबल व्हिलेज ' च्या जोडीनेच ' local is global ' हे वाक्य जोरात पसरलं होतं . तर त्यात कितपत तथ्य असेल ? की उलटी शक्यताच जास्त असेल ?
म्हणजे असं की आपलं पर्यावरण / संस्कृती / परंपरा हीच अंतिम न समजता त्याच्या पलीकडे एक माणूस म्हणून जे मांडू इच्छिते तेच जागतिक वगैरे ठरायची शक्यता जास्त नसेल ना ? थोडक्यात आपल्या पारंपरिक समजुती , चालीरीती , रूढी ह्या देशी जंजाळात / मानसिकतेत अडकून न बसता त्याची मापात दखल घेऊन जागतिक/ सार्वकालिक मानवी भावनांना केंद्रभागी ठेवून स्वतंत्र मांडणी करू इच्छिते ते जागतिक असू शकते


माॅलमध्ये मंगोल ही कथा लिहिल्यानंतर मला असं जाणवलं की माॅल हे जगभरातील समकालीन घटित आहे , तर त्यावर जगभरात काय काय फिक्शन लिहिलं गेलं आहे, त्याचा वेध घ्यावा तर जागतिक साहित्याचं वाचन करणार्या ज्या कुणाला मी विचारलं त्यापैकी कुणीच तसं काही वाचलेलं नव्हतं. नंतर मराठीतच आशुतोष पोतदार की हिमांशू स्मार्त अशा कोल्हापूरच्या एका तरूण नाटककाराचं एक नाटक आणि आता मेट्रोमाॅल 96 ही प्रणवची नवीन कादंबरी , ह्या अनुषंगाने जागतिक साहित्यातील माॅल ह्यावर कुणी एखादा लेख लिहिल्यास जागतिकतेचा वेध घ्यायला ते कामाचं ठरेल.




लिहिल्यास जागतिकतेचा वेध घ्यायला ते कामाचं ठरेल.





त आणि ती सर्वच देशात होती आणि त्यांच्यातील विरोधाभासही ! त्यात मी परंपरा ऍड करेन देशीवादाने ह्या धार्मिक मूल्यांना परंपरेच्या आधारे पुन्हा प्रस्तुत केलं आणि त्यांची सांगड प्रबोधनात्मक मूल्यांशी घालण्याचा प्रयत्न केला विशेषतः साहित्यात हे खूप झाले 


सॉरी टू से प्रथम ग्लोबलायझेशन ही संकल्पना आली जी महामार्गी होती नंतर ग्लोकलायझेशन जी मार्गी आणि देशी ह्यांचा संकर होती जिची लोकल इज ग्लोबल ही घोषणा होती तुमचे पुढचे म्हणणे बरोबर आहे 

आता मॉलविषयी तर आपल्यासाठी तो जेवढा मोठा सांस्कृतिक धक्का होता तेव्हढा तो यूरोअमेरिकेला न्हवता त्यामुळे आपले प्रतिसाद तीव्र होते आणि त्याचे पडसाद माझ्या आणि हेमंत दिवटेच्या कवितेत तुमच्या कथेत उमटले आशुतोषजिचे नाटक मी ना वाचलंय ना पाहिलंय त्यामुळे त्याविषयी मी काही बोलू शकत नाही प्रणवची कादंबरी ही उत्तम आहे ह्यावर लेख हवा हे मान्य आहे मॉल आणि लोकल बाबत एक मुद्दा मी सांगतो माझ्या कवितेत सुरवातीला जो मॉल आहे तो कोल्हापूरचा शेतकरी बाजार आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे भारतातला हा पहिला मॉल आहे ह्या मॉलने आमचे तिळवे भांडार पूर्णपणे बंद पाडले आणि त्याचाही अनुभव कवितेत आहे नंतर मुम्बैचाही मॉल आहे जिथे मी कस्टमर आहे शेतकरी बाजार असल्यानेच इथे नांगरटीला नांगरही मिळतील ह्या अंगाने एक तुकडा आहे मुंबईचा मॉल असता तर हा आला असता काय ? तर नाही म्हणजे वैयक्तिक तिळवे भांडार बंद होणे देशी काही तुकडे व माझे मॉलला मालोबा म्हणणे म्हणजे खंडोबा  ज्योतिबा तसे हा मालोबा वैग्रे आणि पुन्हा मॉल हा जागतिक फिनॉमिनो असल्याने जागतिक महामार्गी ! आता हे सगळं ठरवून लिहिता येत नाही ते होत जात आणि आपण जागा करत देत जातो मी मॉलवर नंतरही कविता लिहिल्या (चॅनेल डिस्ट्रॉयरीत एक कवी ह्या टायटलखाली आहे )( मी माझ्याविषयी हे जे लिहिलंय ते नितीन वाघ ह्यांनी लक्ष्यात आणून दिलंय )जो जन्मजात मुंबईकर आहे असा लेखक मॉल असा बघेल का ? तर नाही . 
मॉल ही एक थीम झाली अशा आणखी कोणत्या थीम्स आपण हाताळल्या ज्या पूर्वीच्या लेखकांनी हॅन्डल केल्या न्हवत्या ?  म्हणजे व्हिडिओ गेमची एक थीम प्रणवने मस्त हाताळलीये किंवा सायबरकॅफ़े ही माझ्यासकट अनेकांनी हाताळलीये अमेरिकेच्या ट्वीन टॉवरवर  झालेला हल्ला हीही माझ्यासकट अनेकांनी हाताळलीये माझी एक कथाही होती ह्यावर ! (अमेरिकेचे अध्यक्ष आले तेव्हा ह्या कथासंग्रहात ती आहे ) इतर अनेकांच्या असतील मला वाटतं आपल्या पिढीचं नीट उत्खनन कुणीतरी केलं पाहिजे 







दिल बहलांनेको गालिब ये खयाल अच्छा हैं

मराठीत जागतिक मूल्ये नाहीत नवं जग नाही म्हणून आधुनिकतावादी मराठी साहित्याला कमअस्सल म्हणायचे तर मराठी साहित्यात देशी मूल्ये नाहीत देशीवादी मराठीला कमअस्सल म्हणायचे म्हणजे मराठी साहित्य कमअस्सल आहे ह्यावर सगळ्यांचेच एकमत ! वस्तुस्थिती काय आहे ?
श्रीधर तिळवे नाईक

मराठीत देशीवाद अनेक पद्धतीने आला म्हणजे नेमाडेंनी तो भाषात्मक तर दिलीप चित्रेंनी तो सर्जनात्मक अंगाने आणला  द ग गोडसे ह्यांनी तो दृश्यात्मक पद्धतीने आणला किंबहुना त्यांच्या देशीवादाला दृश्यात्मक देशीवाद म्हणावा इतका तो दृश्यात्मक आहे  त्यांच्या पुस्तकांची टायटल्स म्हणजे पोत ,शक्तिसौष्ठव, ऊर्जायन, वाकविचार, मातावळ वैग्रे पाहिली तरी हे स्पष्ट व्हावे ते दृश्यात्मकतेमागील तिच्या सौष्ठवामागील अवकाश ,ऊर्जा , चुंबकत्व , मस्तत्व (त्यांना मस्तानी आवडायचं कारण तिचे मस्तत्व होतं ) शाक्तत्व  ह्यांचा धांडोळा घेत राहिले आपल्याकडे साठोत्तरी पिढीचा सांगोपांग धांडोळा घेतला जाईल तेव्हा कदाचित गोडसेंनी आपणाला काय दिलं हे जास्त कळेल