जागतिक दर्जाची गुणवत्ता आपणाला स्वतःहून का कळत नाही ? आपले ह्याबाबतीतले नेमके घोळ काय आहेत ? कि आपली गुणवत्ता ओळखण्याची क्षमता वर्णजातीगोतावळा व्यवस्थेने मारून टाकली आहे ? आपण ज्यांना मान्यता दिली ती आपण दिली कि जगाने मान्यता दिल्यावर आपण दिली ? जागतिक गुणवत्ता ओळखण्याच्या आपल्या कसोट्या काय आहेत नोबल बुकर प्रायझेस ?त्यांचा खप ? त्यांना मिळालेली प्राईस ? मानधन ?
ज्याला नोबल मिळालेले नाही असे समकालीन परदेशी लेखक आपण वाचतो ?आपण अत्यंत भुक्कड लेखक कवी मराठीबाहेर का प्रमोट करतो ? चांगला लेखक मान्यतेअभावी मरून जावा अशीच आपली व्यवस्था आहे काय ?
समानता वसाहतवाद १७५७ ते १८५७
,वसाहतवाद १८५७ ते १९४७ ,
नववसाहतवाद १९४७ ते १९७८
आणि उत्तरवसाहतवाद १९६५ ते १९९०
अशा चार स्टेप्स आपणाला स्पष्ट दिसतात हे सर्व सोडून आपण एकदम देशीवादाची चर्चा का करायला लागलो ?
आफ्रिकेतल्या अत्यंत मागासलेल्या देशातसुद्धा ह्या चर्चा झडझडून झाल्या पण भारतात नुसती पत्रकारिता झाली ?
का ?
श्रीधर तिळवे नाईक
ह्याचा अर्थ आपण समकालीन साहित्याला न्याय देणारे समीक्षक निर्माण करण्यात अयशस्वी झालोय असा होत नाही का ? काव्याग्रहसारखे नियतकालिक चौथ्या नवतेकडे सरकू सुद्धा शकत नाही ह्याचे कारण काय ? देशीवादात गटांगळ्या किंवा सत्यकथेचे कीर्तन हे मराठी साहित्याचे स्वभावविशेष झाले आहेत काय ? प्रचारासाठी फेसबुक वैग्रे चौथी नवता आणि साहित्य मात्र तिसऱ्या किंवा दुसऱ्या नवतेचें ह्या विरोधाभासाचे काय करायचे ? देशीवादाने ऐंशोत्तरी आणि नव्वोदत्तरी गिळली का आणि आताची समकालीन म्हणवून घेणारी पिढीही देशीवादाच्या बसमध्ये का चढू इच्छिते ?
मान्यतेला फाट्यावर मारत लिहायला लागणे हे त्या संस्कृतीचे अपयश असते जोतिबा फुलेंच्यापासून अनेक लेखक हे फाट्यावर मारूनच लेखन करत आले आहेत माझा प्रश्न लेखकाला हे का करावे लागते हा आहे ?
गोतावळा व्यवस्था हे सर्व करत असेल तर आपण सर्व गोतावळे का फाट्यावर मारत नाही ? सर्वचजण गोतावळ्याच्या भाषेत का समीक्षा करायला लागतात बर सत्यकथेने स्वतःच्या मूल्यव्यवस्था तरी डिफाइन केल्या होत्या देशीवादाने नवी मूल्यव्यवस्था डिफाइन करण्याचा प्रयत्न केला ऎशोत्तरी पिढीने निदान साठोत्तरी पिढीपेक्षा आमचा देशीवाद कुठे वेगळा आहे हे तरी नीट डिफाइन करायला नको काय ?